Tata Group नं कर्मचाऱ्यांना केलं मालामाल, पगारात भरघोस वाढ; 16 ते 62 टक्क्यांनी...!

Tata Group: देशातील दिग्गज टाटा समूहाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 16 ते 62 टक्क्यांनी वाढ केली आहे.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak
Published on
Updated on

Tata Group: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्या टाळेबंदी आणि कर्मचारी कपातीसारखे निर्णय घेत असताना, टाटा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील दिग्गज टाटा समूहाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 16 ते 62 टक्क्यांनी वाढ केली आहे.

अशा प्रकारे, 22 लाख कोटी रुपयांची टाटा समूहाने (Tata Group) आपल्या उच्च अधिकाऱ्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, ट्रेंट आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन 16 वरुन 62 टक्के करण्यात आले आहे. टाटा समूह 10 वर्टिकलमध्ये सुमारे 30 कंपन्या चालवतो.

Ratan Tata
Tata Group च्या शेअर्सने दिला छप्परफाड परतावा, गुंतवणूकदार बनले मालामाल!

सीईओला किती पगार दिला ते जाणून घ्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहाने या वर्षी ट्रेंट लिमिटेडचे ​​सीईओ पी वेंकटेशलू यांना पगार म्हणून 5.12 कोटी रुपये दिले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 62% अधिक आहे.

दुसरीकडे, इंडियन हॉटेल्समधील त्यांचे समकक्ष पुनीत चटवाल ​​यांना 18.23 कोटी रुपये वार्षिक वेतन देण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्या पगारात 37% ची वाढ नोंदवली गेली.

टाटा कंझ्युमर आणि व्होल्टासचे सीईओ असलेले सुनील डिसोझा आणि प्रदीप बक्षी यांना वार्षिक सुमारे 9.5 कोटी आणि 3.8 कोटी रुपये दिले जात होते. त्यांच्या पगारात अनुक्रमे 24% आणि 22% वाढ झाली आहे.

टाटा पॉवरच्या सीईओच्या पगारात 16 टक्क्यांनी वाढ

टाटा केमिकल्स आणि टाटा पॉवरच्या सीईओच्या पगारात 16 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. टाटा केमिकल्सचे सीईओ आर मुकुंदन आणि टाटा पॉवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांच्या पगारात 16% वाढ झाली आहे.

यावर्षी त्यांना अनुक्रमे 8 कोटी आणि 9 कोटी रुपये देण्यात आले. अहवालानुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांनाही 29.1 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.

Ratan Tata
Tata Group: पैसे तयार ठेवा! 18 वर्षानंतर टाटा ग्रृपचा बाजारात धडकणार IPO, कमाई करण्याची मोठी संधी

टाटा समूहाची स्थापना 1868 मध्ये झाली

टाटा समूहाची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्याचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. हा भारतातील (India) सर्वात मोठा उद्योग समूह आहे. त्याचा व्यवसाय 6 खंडातील 100 देशांमध्ये पसरलेला आहे.

2021-2022 या वर्षात टाटा समूहाच्या कंपन्यांचा महसूल $ 128 अब्ज म्हणजेच सुमारे 9.6 ट्रिलियन रुपये होता. टाटा समूहाच्या 30 कंपन्यांमध्ये सुमारे 9,35,000 लोक काम करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com