म्हावळींगे: नेस्ले कंपनीने एकाचवेळी ३० कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याने संतप्त कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली. कामगारांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघ त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. या कामगारांनी गेल्या महिन्याच्या ३१ तारखेपासून राज्यात धरणे आंदोलनाला सुरुवात केलीये. आंदोलन करून देखील कोणीही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय.
३१ मार्च पासून सुरु झालेली ही धरणे आंदोलनं सुरु आहेत. कामगारांकडून नेस्लेच्या व्यवस्थापनाला वेळोवेळी पत्रं देण्यात आली मात्र तरीही त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया समोर आली नाही. एवढंच नाही तर या कामगारांकडून कामगार आयुक्त आणि कामगार सचिवांना देखील पत्राद्वारे याबद्दल माहिती देण्यात आलीयेत.
आमदार,मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सर्वांना याबद्दल माहिती देऊन सुद्धा त्यांनी म्हणावी ती कामगिरी केलेली नाही. काही कामगारांना या आंदोलनमध्ये सभागी व्हायची इच्छा आहे मात्र कंपनी त्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी देतेय, हा प्रकार जर थांबा नाही तर आमरण उपोषण करावं लागेल असं राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर म्हणाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.