वाळपई: नगरगाव-आंबेडे सत्तरी येथील श्रवण बर्वे खूनप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतलेली गावातील १५ मुले रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नगरगाव-आंबेडे येथील सुमारे ५० स्थानिक रहिवाशांचा जमाव वाळपई पोलिस स्थानकाकडे जमला. जोपर्यंत आमची मुले परत येत नाहीत, तोपर्यंत पोलिस स्थानकासमोर ठिय्या मारण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला. रात्री १० वाजता यापैकी १२ मुलांना पोलिसांनी सोडले; परंतु तिघांना पर्वरी येथे चौकशीसाठी नेले असून त्यांनाही रात्री उशिरा सोडणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.