Belagavi Goa Via Anmod Ghat Dainik Gomantak
Video

Ravi Naik on Ghat Road: गोवा-बेळगाव महामार्गावरील घाट रस्त्यांचे काम एप्रिल २०२५ पर्यंत होणार पूर्ण

Belagavi Goa Via Anmod Ghat: अनमोड मार्गे बेळगाव ते गोवा दरम्यानचा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी कृषिमंत्री नाईक यांनी मंत्री नितीन गडकरी यांना केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Anmod Ghat

फोंडा: अनमोड मार्गे बेळगाव ते गोवा दरम्यानचा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे या मार्गाने वाहतूक करणे जिकिरीचे झाले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी कृषिमंत्री रवी नाईक यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. त्यानुसार एप्रिलपर्यंत हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त केला जाईल अशी हमी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाईक यांना दिली आहे.

तिनईघाट ते अनमोड येथील सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे बेळगावहून गोव्यात होणारी मालवाहतूक तसेच प्रवासी वाहनांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. वाहने खराब होण्याचे प्रकार घडत असल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी रवी नाईक यांनी केली होती.

यासंबंधी नाईक यांनी १९ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत गडकरी यांनी नाईक यांना २ नोव्हेंबरला पत्र पाठविले. आता १८ नोव्हेंबरला गडकरी यांनी पुन्हा पाठविलेल्या पत्रात यासंबंधीचे काम सुरू झाल्याचे नमूद करून एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी हमी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT