Vijai Sardesai Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2025: गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाईंनी जातीची गणना करण्याची केली मागणी

Vijai Sardesai: राज्यात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केली. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘नोंद घेतली’, अशा एका शब्दात उत्तर दिले.

सरदेसाई म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या किमान ५० टक्के लोकसंख्या ही इतर मागासवर्गीयांची आहे. भंडारी समाजासह १९ समाजांचा त्यात समावेश आहे. शेवटची जातीनिहाय जनगणना २०११ मध्ये झाली होती. सरकारी योजनांचा आर्थिक, सामाजिक लाभ या समाजाला देण्यासाठी त्यांची नेमकी संख्या किती याची माहिती सरकारकडे असणे आवश्यक असते.

पूर्वीच्या आकडेवारीवर सरकार निधीचे वाटप करत असल्याने इतर मागासवर्गीय समाजावर राज्यात अन्याय होतो. तो अन्याय दूर करण्यासाठी नवी आकडेवारी सरकारला मिळवावी लागेल. यासाठी जातीनिहाय जनगणना राज्यात केली जावी आणि ती केली जाईल, असे आश्वासन सरकारने द्यावे.

विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे यासाठी जनगणना हा पाया आहे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT