सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वनविभागाने तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या संततधार आणि अतिवृष्टीमुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीपर्यंत वाढला असून परिसरात दरड कोसळण्याची तसेच घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी आंबोली धबधब्याकडे जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून हवामान आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.