पणजी: जमीन, वीज आणि पाणी जोडणीवरील वाढत्या कौटुंबिक वादांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लागू केलेल्या घरांच्या विभाजन धोरणाचे आप युवा विंगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी स्वागत केले आहे. मात्र, केवळ धोरण आणून उपयोग नाही, तर ते लोकांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरावे यासाठी त्याची अंमलबजावणी प्रक्रिया सोपी केली पाहिजे, असे मत भगत यांनी व्यक्त केले. "आम्ही सरकारच्या या पावलाचे कौतुक करतो, परंतु हे धोरण नोकरशाहीचा अडथळा बनू नये," असे ते म्हणाले. कुटुंबांना प्रत्यक्षात या धोरणाचा वापर करता यावा आणि त्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्याची मागणी सिद्धेश भगत यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.