Manoj Bajpayee Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Bajpayee :"मी 6 महिन्यांनी परत आलो तेव्हा माझ्या खोलीत 10 जण झोपले होते"! मनोज वाजपेयींनी सांगितला किस्सा...

अभिनेते मनोज वाजपेयींनी आपल्या संघर्षाचा एक गंमतशीर किस्सा सांगितला आहे

Rahul sadolikar

अभिनेता मनोज वाजपेयी एक दमदार आणि वेगळ्या शैलीच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना मनोज वाजपेयींनी आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सत्या, शूल, अलीगड, गॅंग्ज ऑफ वासेपूर यांसारख्या चित्रपटांतून मनोज वाजपेयींनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे.

अतिशय खडतर संघर्षातून मनोज वाजपेयींनी आपला यशस्वी प्रवास केला आहे. मनोज वाजपेयीने आपल्या संघर्षाच्या काळातला एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा एका चाळीत घडला होता जिथे मनोज वाजपेयी राहत होते

मूळचा बिहारचा असलेला बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी दिल्लीहून मुंबईत आला. अभिनेत्याने कोणत्याही मोठ्या अभिनय संस्थेत प्रशिक्षण घेतलेले नसले तरी, त्याला दिल्लीत थिएटर करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. ;पण, 1990 च्या दशकात जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा त्याला 'सत्या (1998)' या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी काही काळ थांबावे लागले. यावेळी त्यांनी मुंबईतील एका चाळीत 10 चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसोबत राहिल्याचे आठवले.

मुलाखतीत मनोजने त्याच्या संघर्षमय दिवसांबद्दल आणि त्याला कसे हताश वाटायचे याबद्दल सांगितले. मनोज म्हणाला , 'तुम्हाला तुमची नोकरी माहीत असतानाही तुम्हाला काम मिळत नाही ही निराशा होती. शिवाय, सर्व मित्र अनेकदा भेटायचे, एकत्र बसायचे, वाचायचे, सराव करायचे हे खूप छान होते. मी दिवसभर व्यस्त असायचो. 

मी एका चाळीत दोन लोकांसोबत राहत होतो, सहा महिन्यांनी परत आलो तेव्हा मला तिथे किमान 10 लोक झोपलेले दिसले. तिग्मांशु धुलिया त्यापैकीच एक. 'धूम' बनवणाऱ्या विजय कृष्ण आचार्य यांनीही आपला बराचसा वेळ तिथेच घालवला.' ही सगळी स्ट्रगल करणारी मंडळी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT