Javed Akhtar Dainik Gomantak
मनोरंजन

Javed Akhtar: 'अ‍ॅनिमल' सारखे चित्रपट पुन्हा निर्माण होऊ नये ही प्रेक्षकांची जबाबदारी, चित्रपटावर नाराज जावेद अख्तर

Javed Akhtar: त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होणे धोकादायक असल्याचे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: 'अ‍ॅनिमल' चित्रपट हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला होता. रणबीर, अनिल, बॉबी, रश्मिका आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने अंदाजे 896.61 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अॅनिमल चित्रपटाचे जितके कौतुक झाले तितकीच या चित्रपटावर टीकादेखील झाली. आता जावेद अख्तर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी अॅनिमलसारखे चित्रपट निर्माण होणे, त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होणे धोकादायक असल्याचे वक्तव्य केले आहे. याबरोबरच, त्यांनी अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची ताकद फक्त प्रेक्षकवर्गाकडे असल्याचेदेखील म्हटले आहे.

ज्या चित्रपटात महिलेला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे, त्या चित्रपटाची इतकी कमाई होणे, बॉक्स ऑफीसवर तो चित्रपट हिट ठरणे धोकादायक असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

एकीकडे अॅनिमलची टीम सक्सेस पार्टी करत असताना जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT