HBD Akshay Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Akshay : अक्षय कुमारने जेव्हा धर्मासंदर्भात ते विधान केलं होतं... कित्येकांनी भुवया उंचावल्या होत्या

अभिनेता अक्षय कुमारने एकदा एक विधान केलं होतं. धर्मासारख्या संवेदनशील विधान केल्यामुळे अक्षयची जोरदार चर्चा झाली होती.

Rahul sadolikar

Happy Birthday Akshay Kumar : बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचं इंडस्ट्रीत एक वेगळा चाहता वर्ग आहे. 9 सप्टेंबरला अक्षय आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे.

विनोदी, गंभीर अशा सर्व प्रकारच्या भूमींकामधुन आजवर अक्षयने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

'हेरा फेरी'चा असो किंवा रुस्तम अक्षयने आपल्या भूमीकांमधुन प्रत्येकवेळी काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न केला आहे.

चला पाहुया आजच्या विशेष दिवशी अक्षयची ते विधान ज्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती.

फक्त भारतीय असण्यावर विश्वास

अक्षयचं हे विधान सगळ्या धर्मांबाबतचं त्याचं मत सांगणारं होतं. अक्षय कुमारने आपल्या सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हे विधान केलं होतं.

2021 च्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षय असं बोलला होता की, तो कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही, त्याचा विश्वास फक्त त्याच्या भारतीय असण्यावर आहे.

माझा कुठल्याच धर्मावर विश्वास नाही

सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले होते की सूर्यवंशी हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट धर्माकडे झुकलेले आहेत असे त्याला वाटते का? त्यावर अक्षयने उत्तर दिले होते, “मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. 

मी फक्त भारतीय असण्यावर विश्वास ठेवतो आणि हेच चित्रपटातून दिसून येते. भारतीय असण्याचा विचार करायला हवा. आपण त्याकडे धर्माच्या आधारावर पाहिलेले नाही.

तो पुढे म्हणाला की चित्रपटात कोणत्याही विशिष्ट धर्माला खलनायकी रंगात रंगवण्याची जाणीवपूर्वक निवड नाही. “आम्ही नकारात्मक आणि सकारात्मक भूमिका असलेले चित्रपट बनवतो, मी फक्त एक पात्र साकारत आहे. प्रत्येक चित्रपटात चांगली आणि वाईट अशी दोन्ही पात्रे असतील, प्रेक्षक चित्रपटातून काय परत घ्यायचे हे समजून घेण्याइतके हुशार आहे - चांगले की वाईट," तो पुढे म्हणाला.

सूर्यवंशी, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित, दिग्दर्शकाच्या पोलीस विश्वाचा एक भाग आहे. यात कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्याही भूमिका होत्या.

अक्षय कुमारला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी नुकतेच भारतीय नागरिकत्व मिळाले . अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर कागदपत्रांचे छायाचित्र पोस्ट केले. यापूर्वी अक्षयकडे फक्त कॅनडाचे नागरिकत्व होते.

अक्षय कुमार

अक्षय 2019 एका कार्यक्रमात म्हणाला “होय, मी 2019 मध्ये सांगितले होते, मी त्यासाठी (भारतीय नागरिकत्व) अर्ज केला होता. मग त्यानंतर महामारी झाली आणि 2-2.5 वर्षांसाठी सर्व काही बंद झाले. माझे व्हिसा येथे आहे आणि लवकरच माझा संपूर्ण पासपोर्ट येईल, ”

अक्षयचा ओएमजी

अक्षय कुमार शेवटचा कोर्टरूम ड्रामा OMG 2 मध्ये दिसला होता , जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तो मिशन राणीगंज या चित्रपटात दिसणार आहे, जो 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT