rajesh tope.jpg
rajesh tope.jpg 
महाराष्ट्र

'देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?'

दैनिक गोमंतक

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरवात केली असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. अशातच कोरोना व्हायरस लसीवरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य अधिकारी राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यात लसीची तीव्र कमतरता असूनही, केंद्र सरकारने राज्याला लसीचे  केवळ साडेसात लाख डोस दिले. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांना जास्त प्रमाणात लस डोस देण्यात आल्याचा आरोप यावेळी राजेश टोपे यांनी केले आहेत.  दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम ते राज्य सरकारच्या कोरोनाच्या एकूण धोरणावर टीका केली होती. त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली असतान डॉ.  हर्ष वर्धन यांच्या आरोपांना आता राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. ( Why 7.5 lakh for a state with 50 per cent patients across the country and more for others)

महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० लाखावर पोहोचली आहे.  तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४.५ लाख इतकी आहे. मृतांची संख्या ५७ हजारवर पोहोचली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.  आज सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे बुलढाण्यात फक्त आजच्या दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहीला आहे.  मात्र केंद्र सरकारने राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. मात्र देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का,  असा सवाल राजेश टोपेंनी विचारला आहे. 

महाराष्ट्राला ७ दिवसाला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहील, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला यात तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.  दर आठवड्याला ४० लाख लसींची मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोना काळात राज्यातले सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT