या दंगली अमरावती (Amravati), नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे.
या दंगली अमरावती (Amravati), नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अमरावतीतील बंदला हिंसक वळण

दैनिक गोमन्तक

त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद आजही महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात पहावयास मिळत आहे. शनिवारी अमरावतीमध्येही (Amravati) अंदोलनाला (Agitation) हिंसक मिळताना दिसत आहे. अमरावतीमध्ये आज भाजपच्यावतीने (BJP) बंद पाळण्यात आला होता. परंतू या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलक कर्त्यांकडून दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जमावाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. अमरावतीत पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलन कर्त्यांना शांत करण्यासाठी कोठेतरी कमी पडताना दिसत होता. अमरावतीत शनिवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता. हिंसक आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी लाठिचार्ज देखील करण्यात आला. कारण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलन कर्त्यांनी अमरावतीतील राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेथेही या आंदोलनाला हिंसक वळण पहावयास मिळाले. आमरावती शहर बंद करण्यात आले. काल अमरावतीत जिल्हाधिकार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला देखील हिंसक वळण लागले होते.

याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या माध्यमातून मी वैयक्तिकरित्या त्यावर लक्ष ठेवत आहे. कोणी दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे, मी सर्वांना आवाहन करतो. मी पोलिसांनाही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करतो. संयम आणि शांतता राखा." ते पुढे म्हणाले, "त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला. यादरम्यान नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अमरावतीत अधीकची फौज पाठविण्याच्या सूचना गृहमंत्री दिलिप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा भाजपचा प्रसत्न : संजय राऊत

या दंगली अमरावती, नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे. भाजपचा महाराष्ट्राल अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपला अनेक चाैकश्यालावूनही सरकार पाडता येत नाही. त्यामुळे भाजपचे लोक आता दंगली घडविण्याचे कारस्तान सुरु आहे. राज्य सरकार अस्थिर करायचे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असा भाजप प्रयत्न करत आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

दरम्यान, काल मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची घोषणा केली होती, यादरम्यान तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. नांदेड, मालेगाव येथे उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 23 जण आणि 7 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. दोन्ही शहरांमध्ये जमावाने दुकानांना लक्ष्य करून तोडफोड केली. दुसरीकडे, अमरावतीमध्ये जमावाने सुमारे 22 दुकानांना आग लावली. या तोडफोडीच्या निषेधार्थ भाजपने आज अमरावतीत बंदची घोषणा केली आहे. हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अलीकडेच त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाल्याचा आरोप मुस्लिम संघटना करतात. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरातील वातावरण तापले होते. तेथे त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला. मशिदींचे नुकसान आणि तोडफोड झाल्याच्या बातम्याही आल्या. मात्र पोलिसांनी तपासात हे वृत्त फेटाळून लावले. पण ते तणावपूर्ण वातावरण आणि काही सोशल मीडिया पोस्टमुळे देशभरात त्रिपुरा हिंसाचाराचा निषेध झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Fatal Accident: अपघातानंतर दोघेही अर्धातास वाहनात अडकून पडले, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Today's Live News: विकट भगत विरोधात पुन्हा गुन्हा नोंद

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

SCROLL FOR NEXT