vinayak raut.jpg 
महाराष्ट्र

परमबीर सिंह भ्रष्टाचाराने बरबटलेले; विनायक राऊत यांचे गंभीर आरोप

दैनिक गोमंतक

मनसुख हिरेन प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केल्या नंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार  अडचणीत आल्याचे दिसते आहे. महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणाबद्दलचे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर सिंह हे स्वतःच भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केलं आहे. (Vinayak Raut said that Parambir Singh is corrupted)

सचिन वाझे यांच्याकडून महिन्याला 100 कोटी वसूल करून देण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानंतर विरोधीपक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vianayak Raut) यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी परमबीर सिंह हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत असा गंभीर आरोप केला. परमबीर सिंह हे केंद्राचे बोलके पोपट असून त्यांच्यावर गुन्हादाखल सुद्धा आहे, असेही ते पुढे म्हणाले. तर, परमबीर सिंह यांनी सुद्धा या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर आज लोकसभेत सुद्धा या प्रकरणामुळे गदारोळ झाला. अपक्ष खासदार नवनीत राणा तसेच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी राज्यसरकार आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आह. गृहमंत्री खंडणी मागायला लागलेत, सरकार भ्रष्ट झाले आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याने महाराष्ट्रात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा, असे खासदार गिरीश बापट संसदेत म्हणाले. तर सचिन वाझे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला सेवेत का रुजू केले असा प्रश्न नवनीत कौर राणा(Navnit kaur Rana) यांनी संसदेत उपस्थित केला.   
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT