Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय, प्रफुल्ल पटेल यांचे ट्विट व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे सर्व विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे सर्व विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त करण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने बुधवारी याबाबय माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल (Paraful Patel) यांनी देखील ट्विट केले आणि म्हटले की, "राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने, सर्व विभाग आणि कक्ष तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहेत". (Sharad Pawar big decision before Lok Sabha elections Praful Patel tweet goes viral)

मात्र, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या पटेल यांनी या अचानक कारवाईचे कारण अध्याप सांगितलेले नाही. प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार पडल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर असा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीपूर्वी जुन्या पदाधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

पक्ष मजबूत करण्यावर शरद पवारांचा भर

गेल्या महिन्यात सत्ता गमावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वत:ला मजबूत करण्यावर भर दिला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 263 सदस्यीय बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महानगरातील पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. खुद्द शरद पवारही मुंबईवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT