Raju shetty
Raju shetty Dainik Gomantak
महाराष्ट्र

''राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय ?''

दैनिक गोमन्तक

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. ऊस जात नसल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त असुन यापैकी नामदेव जाधव रा. हिंगनगाव ता. गेवराई या 35 वर्षीय शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून त्याच फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Raju Shetty's question to the state government regarding farmer suicide )

मृत जाधव शेतकरी यांना दोन एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतात 265 जातीचा ऊस लावलेला आहे. ऊस लागवडीसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला. मे महिन्याचा दुसरा आठवडा आलेला असताना ऊस जात नसल्याने जाधव हे नैराश्येत राहत असे. कारखानदारांकडे अनेक वेळा चकरा मारूनही त्यांचा ऊस गाळप होत नसल्याने त्यांनी आज सकाळी उसाचा फड पेटवत त्याच फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी सरकारला खडा सवाल करत पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय ? सवाल करत जगाचा पोशींदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कोण वाली आहे का ? अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे.

यावेळी “ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य शासन जबाबदार आहे , असा आरोप शेट्टी केला. तसेच मृत शेतकरी यांच्या आत्महत्येला जबाबदार असणारे अधिकारी, मुकादम, ऊसतोडणी मशीन चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

वास्तविक मराठवाड्यामध्ये यंदा अतिरिक्त ऊस आहे. याची शासनाला कल्पना होती. सक्षम साखर कारखान्यांकडे अतिरिक्त ऊस गाळपासाठी दिला असता तर अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली नसती. त्यातून जाधव सारख्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. या आत्महत्येस राज्य शासन जबाबदार आहे. असं ही शेट्टी यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT