Maharashtra Weather Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather: तापमानाचा पारा घसरला, राज्यात थंडीचा तडाखा

Maharashtra Weather News: राज्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान घटले आहे. यामुळे पुन्हा शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस तर काही तापमानात घट पाहायला मिळत आहे. या सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर आणि मानवी आरोग्यावर (Health) होत आहे. असे असतांना आता पुन्हा राज्यात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात आज अनेक जिल्ह्यात सकाळच्या किमान तापमानात घट झाल्याचे आढळले. पारा हा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने शक्यता दर्शवली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी कमी होऊन पाऊस (Rain) आणि ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळाले. मंदोस चक्रीवादळाचा जोर ओसरला असल्याने पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. ही थंडी थंडी या आठवड्यापर्यंत टिकून राहणार आहे.

देशात पूर्वेकडील राज्यात थंडी वादळी आहे. या सोबतच धुके देखील वाढले आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या धुक्यामुळे रेल्वे आणि विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT