Maharashtra Weather Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather: तापमानाचा पारा घसरला, राज्यात थंडीचा तडाखा

Maharashtra Weather News: राज्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान घटले आहे. यामुळे पुन्हा शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस तर काही तापमानात घट पाहायला मिळत आहे. या सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर आणि मानवी आरोग्यावर (Health) होत आहे. असे असतांना आता पुन्हा राज्यात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात आज अनेक जिल्ह्यात सकाळच्या किमान तापमानात घट झाल्याचे आढळले. पारा हा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने शक्यता दर्शवली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी कमी होऊन पाऊस (Rain) आणि ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळाले. मंदोस चक्रीवादळाचा जोर ओसरला असल्याने पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. ही थंडी थंडी या आठवड्यापर्यंत टिकून राहणार आहे.

देशात पूर्वेकडील राज्यात थंडी वादळी आहे. या सोबतच धुके देखील वाढले आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या धुक्यामुळे रेल्वे आणि विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT