Mumbai-Goa Highway file photo  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकाच बाजुने वाहतूक सुरू

वाहनधारकांना फटका, जेसीबीच्या सहाय्याने डागडुजी

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हा दोन मोठ्या शहरांना जोडणारा महामार्ग असल्याने तो नेहमीच वर्दळीचा असतो. हा महत्वाचा महामार्ग रत्नागिरीमध्ये खचला आहे. त्यामुळे येथे एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. परिणामी येथील वाहतूक थोडी संथगतीने सुरू आहे.

बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अनेक ठिकाणी वाईट झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी या दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा चौपदरीकरण सुरु असलेला रस्ताच खचला आहे. दरम्यान, यावर तातडीने उपाय न केल्यास हा पूर्ण महामार्ग ठप्प होण्याची भीती आहे. रस्ता खचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येताहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.

दरम्यान, ज्या भागात रस्ता खचला आहे, तेथील निकृष्ट कामाला ग्रामस्थ ठेकेदाराला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, येथे सध्या जेसीबीच्या साह्याने डागडूजी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT