Mumbai-Goa Highway file photo  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकाच बाजुने वाहतूक सुरू

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हा दोन मोठ्या शहरांना जोडणारा महामार्ग असल्याने तो नेहमीच वर्दळीचा असतो. हा महत्वाचा महामार्ग रत्नागिरीमध्ये खचला आहे. त्यामुळे येथे एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. परिणामी येथील वाहतूक थोडी संथगतीने सुरू आहे.

बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अनेक ठिकाणी वाईट झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी या दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा चौपदरीकरण सुरु असलेला रस्ताच खचला आहे. दरम्यान, यावर तातडीने उपाय न केल्यास हा पूर्ण महामार्ग ठप्प होण्याची भीती आहे. रस्ता खचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येताहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.

दरम्यान, ज्या भागात रस्ता खचला आहे, तेथील निकृष्ट कामाला ग्रामस्थ ठेकेदाराला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, येथे सध्या जेसीबीच्या साह्याने डागडूजी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT