Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

....म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वांची माफी मागावी: फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले आहे. यायबत बोलताना फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाचे स्वागत केले. (Devendra Fadnavis Latest News)

पणजीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचे वर्तन हे असंविधानिक आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 12 आमदारांना सरकारने निलंबित केले होते. यासाठी खोटी गोष्ट रंगवली, न घडलेले प्रसंग घडल्याचे सांगितले. मागच्या कोर्टाने त्यांना निलंबन मागे घेण्याची संधी दिली होती. मात्र, हे सरकार स्वत:ला सर्वोच्च समजते. आज सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला.

फडणवीस पुढे म्हणाले, सरकारने या 12 आमदारांवर (MLA) अन्याय केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांनी विधानसभेच्या बाहेर ठेवले. हा जनतेचा देखील अपमान आहे. हे आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी सरकारने सर्वांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. फडणविसांनी या निर्णयाचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT