Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्रात 100-200 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार

दैनिक गोमन्तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शरद पवार यांचे वय, शारीरिक व्याधी यावरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिच्यावर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. ( Jitendra Awhad's reaction from Ketki Chitale's post said ... )

Ketki Chitale

याबाबत बोलताना आव्हाड यांनी म्हटले आहे कि, “केतकी चितळे इतकी विकृत असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो. असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे.तिने काय लिहिले आहे ते लोकांना वाचावे आणि तेच तुमच्या आजोबांबद्दल किंवा वडिलांबद्दल लिहिले तर काय वाटेल याचा विचार करा.

त्या माणसासोबत राजकीय दृष्ट्या लढा. त्याला आम्ही उत्तर देतो. तुम्ही त्यांचा चेहरा कसा झालाय यावर बोलणार असाल तर उद्या आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तर तुम्हाला ओरडता येणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हटले आहे.

माझ्यासारखा माणूस जो शरद पवारांसोबत ३५ वर्षे आहे तो हे कसे काय सहन करेल.आज महाराष्ट्रात १००-२०० पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. शेवटी ते राष्ट्रवादीच्या कुटुंबाचे बाप आहेत. असे ही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: चंद्र पडणार मोठा प्रभाव! 'या' राशींसाठी शुभसंकेत; वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Selaulim: सगळी शेतजमीन ओलिताखाली आली असती तर गोवा ‘ फूड सरप्लस ‘ झाला असता, पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही..

गोव्यात, विशेषतः 'पणजी' निवडणुकांसंदर्भात लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी असताना 'नेपाळ'सारख्या छोट्या देशावर का लिहावे लागतेय? चेतना

Ferdino Rebello: 'गोवा' सांभाळणे ही काळाची गरज, सत्तेत असलेल्यांनी शब्दांचे भान राखावे! न्यायमूर्ती रिबेलोंचा सल्ला

'उत्पल यांना भाजपात येण्यास विरोध नाही'! मंत्री बाबूश यांचे प्रतिपादन; मनोहर पर्रीकरांचे पक्षासाठी मोठे योगदान असल्याची केली आठवण

SCROLL FOR NEXT