Sharad Pawar

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

मी काँग्रेस सोडली, पण... : शरद पवार

काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करुनही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी कधीही सोडली नाही.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करुनही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी कधीही सोडली नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) स्थापन करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहिली. परंतु याची खंत नाही, असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. ती कल्पना आम्ही स्वीकारली आणि त्यावर काम केले. काँग्रेस (Congress) हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काही वेगळं करण्याचा विचार कधीच केला नाही. मला हा निर्णय घ्यावा लागला (To establish the Nationalist Congress Party). कारण काँग्रेसने मला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.

आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरु, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल, असा सर्वसामान्यांचा समज आहे का, असा सवाल त्यांनी केला त्यावर या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आज गरज आहे ती सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT