Sharad Pawar

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

मी काँग्रेस सोडली, पण... : शरद पवार

काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करुनही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी कधीही सोडली नाही.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करुनही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी कधीही सोडली नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) स्थापन करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहिली. परंतु याची खंत नाही, असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. ती कल्पना आम्ही स्वीकारली आणि त्यावर काम केले. काँग्रेस (Congress) हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काही वेगळं करण्याचा विचार कधीच केला नाही. मला हा निर्णय घ्यावा लागला (To establish the Nationalist Congress Party). कारण काँग्रेसने मला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.

आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरु, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल, असा सर्वसामान्यांचा समज आहे का, असा सवाल त्यांनी केला त्यावर या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आज गरज आहे ती सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

Kala Academy Award Controversy: कला अकादमी सॉफ्ट टार्गेट! युगांक नायक यांच्या आक्षेपामुळे पुरस्कारावरुन वादंग; नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये बदलाची गरज

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT