Honor killing in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Honor killing धक्कादायक..मुलगी घराबाहेर राहिली म्हणुन वडील, चुलत्याने दिली भयंकर शिक्षा

मुलगी तीन दिवस घराबाहेर राहिली म्हणुन जालन्यात वडील आणि चुलत्याने तिला भयंकर शिक्षा दिली

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्र ऑनर किलींगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरला आहे. जालन्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा ऑनर किलींगचा भयाण चेहरा समोर आला आहे. आपली मुलगी तीन दिवस घरबाहेर राहिल्याने आपली अब्रु गेली अशा समजुतीतुन वडील आणि चुलत्याने मुलीला झाडाला लटकावुन फाशी दिल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे.

या घटनेनं जालना जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी मृत तरुणीच्या वडिलांसह काकांना अटक केली आहे.

या तरुणीचे नात्यातल्याच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आपल्या प्रियकरासोबत ती तीन दिवस घराबाहेर राहिली होती. त्यामुळे समाजात आपली बदनामी झाली या रागातुन तरुणीचे वडील आणि काकांनी तिला झाडाला लटकावुन तीचा खुन केला.

ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न कुटूंबियांनी केला. अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला पण गावात या प्रकरणाची चर्चा झाली आणि सत्य बाहेर आलं.

कौंटुबिक मुल्यांना पायदळी तुडवणारी आणि माणुसकीवर प्रश्नचिह्न निर्माण करणारी ही घटना जालना जिल्ह्यातील पिरपिंपळगाव इथं घडली आहे. संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरणातील संशयितांनी नावं आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT