Heavy rains are expected in Maharashtra in the next four days Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार सरी

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि त्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशीक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे मराठवाड्यात काहीशी पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र मुसळधार पावसाने एक ते दोन दिवसांची उघडीप दिली आहे. आता परत येत्या काही चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि त्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशीक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दडी मारली होती. त्यानंतर गेल्या सोमवारपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊसाची सक्रियता वाढू लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये तसेच नाशिकमधील चाळीसगाव परिसरात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे तितुर. डोंगरी, वाडी या उपनद्यासंह गिरणा नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी नदीशेजारील अनेक गावामध्ये शिरले असून 20 गावांचा संपर्क होऊ शकला नव्हता. तर दुसरीकडे गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे एका महिलेसंह गुराढोरांचाही बळी गेला होता. त्यानंतर लगेच एक दिवस आगोदर मुसळधार पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यातच आता 8 सप्टेंबरला मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यातही आला आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये येत्या चार ते पाच सप्टेंबरला मुसळधार सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सहा सप्टेंबरला कोकणामधील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तसेच मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. शिवाय, सात सप्टेंबरला खानदेशातील नाशिक मराठवाड्यातील औरंगाबाद त्याचबरोबर कोकणातील पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तसेच आठ सप्टेंबरला पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पाऊसाच्या शक्यतेसंबंधी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT