BJP Dainik Gomantak
महाराष्ट्र

सावरकरांवरुन पुन्हा वादंग, BJP ने खेळला नवा डाव; गौरव यात्रेचा प्लॅन...

BJP: हे एक ऐतिहासिक तथ्य आहे, ज्याचा संदर्भ आहे, असे हरिश रावत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

BJP: राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसदेतील आपली खासदारकी रद्द करत निषेध नोंदवला होता.

राहुल गांधींनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचा उल्लेख केला होता. त्यामुळे देशभरातले वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर ज्या ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला होता, त्या ठाकरेगटानेदेखील सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यात सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी जर राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर त्यांच्याविरुद्ध केस दाखल केली जाईल असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ कॉंग्रेसनेता हरिश रावत यांनी राहुल गांधींचा बचाव करत राहुल गांधींनी जे म्हटले ते ऐतिहासिक तथ्य आहे असे म्हटले आहे. याप्रकरणात कॉंग्रेसने फक्त भाजपला आरसा दाखवला आहे. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे, ज्याचा संदर्भ आहे, असे हरिश रावत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा मुद्दा फक्त उद्धव ठाकरेंपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेबरोबर जोडला आहे. सावकर हे स्वातंत्रवीर होते , समाजसुधारक होते.

आम्ही कालही कॉंग्रेसच्या बैठकीत गेलो नव्हतो आणि आजही जाणार नाही. आम्ही या मुद्यावर राहुल गांधीबरोबर चर्चा करु असेही त्यांनी म्हटले आहे. याबरोबच भाजपने गौरव यात्रा काढणार असल्याचे म्हटले आहे.

आता या प्रकरणावरुन देशातले आणि राज्यातले राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT