Kashid Beach Raigad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad: धक्कादायक! रायगडच्या काशिद समुद्रात 4 विद्यार्थी बुडाले, दोघांचा मृत्यू

मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

रायगडच्या काशिद येथील समुद्रात चार शालेय विद्यार्थी बुडाले असून, त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेची सहल रायगड जिल्ह्यात आली असताना, काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर शाळेचे विद्यार्थी पोहोचले त्यावेळी ही घटना घडली. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाचे हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(Four Students Drowned at Raigad's Kashid Beach, Two died)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड येथे आली. दरम्यान काशिद समुद्र किनाऱ्यावर आल्यांनतर चार विद्यार्थी समुद्रात बुडाले. चारपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं तर, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्यानंतर त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

प्रणय कदम, रोहन संतोष बेडवाल, कृष्णा विजय पाटील आणि तुषार हरीभाऊ वाघ हे चार विद्ययार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT