Areca nut (Supari) Dainik Gomantak
महाराष्ट्र

Supari : कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं; सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड

गोमन्तक डिजिटल टीम

संपूर्ण जगात सुपारीचे उत्पादन भारतात केले जाते. कोकण पट्ट्यात सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. एका आकडेवारीनुसार, जगातील 50 टक्के सुपारीचे उत्पादन भारतात होते. पान गुटख्यापासून ते धार्मिक कामांपर्यंत त्याचा वापर केला जातो. मात्र, आता त्याच सुपारीवर कोकणात गळ रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहे.

कोकण म्हटलं की, नारळ, सुपारीच्या बागा, नीळाशार समुद्र असे चित्र समोर येते. येथील शेतकरी हा सुपारी, नारळ, काजु, कोकम, आंबा या पिकांचे उत्पादन घेतो. सुपारीची झाडे नारळासारखी 50-60 फूट उंच असतात आणि एकदा लागवड केल्यास 7-8 वर्षात फळ मिळायला सुरवात होते आणि अनेक दशके उत्पन्न होत राहाते. मात्र, आता या सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात येते. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात 70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे. अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं सुपारीवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT