सर्वोच्च न्यायालय Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोना बाधित कुटुंबांना भरपाई देण्यास दिरंगाई; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

महाराष्ट्राशिवाय पश्चिम बंगाल (West Bengal) आणि राजस्थान सरकारच्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाबाधित (Corona) कुटुंबांना भरपाई देण्याबाबतच्या हलगर्जीपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. न्यायमूर्तींनी महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) वकिलांना सांगितले की, प्रतिज्ञापत्र आम्हाला दाखवू नका, ते तुमच्याच खिशात ठेवा, आणि ते जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.

कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी समोर आली आहे. महाराष्ट्राशिवाय पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारच्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे.

राजस्थान आणि पश्चिम बंगाल

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रासोबतच राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारलाही फटकारले. राजस्थानमध्ये कोरोनामुळे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईसाठी केवळ 595 अर्ज प्राप्त झाले. यापैकी एकाही कुटुंबापर्यंत मदत पोहोचू शकली नाही. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही 19 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी केवळ 467 कुटुंबांनी भरपाईसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ 110 लोकांनाच मदत मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे 22 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. यापैकी 16 हजार 518 कुटुंबांनी मदतीसाठी अर्ज केले. त्यात आतापर्यंत 9 हजार 372 लोकांना मदत देण्यात आली आहे.

मदत पोहोचली नाही

कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही मदत देण्यास विलंब होत आहे. यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारने अद्यापही एका कुटुंबाला मदतीची रक्कम दिली नसल्याने न्यायालय नाराज झाले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरकारकडून असा हलगर्जीपणा कसा काय असू शकतो? ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. नाहीतर आपल्याला काहीतरी करावे लागेल. न्यायमूर्ती एम.आर.शहा यांनी फटकारले आणि असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT