Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Breaking News: 'संविधानाने केंद्रा इतकेच राज्यांनाही अधिकार दिले'

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायंमदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायंमदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित होते.

म्हणाले, एका अप्रतिम न्यायमंदीराचे आज लोकार्पण होत आहे. परंतु झेंडा लावण्यासाठी मी आलो आहे. या इमारतीबद्दल मी आपण सर्वांनी ऐकलं आहे. या खंडपीठाचा इतिहासही सर्वांना माहिती आहे. ही इमारत पाहण्यासाठीही लोक आले पाहिजे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये'. मुंबईमधील कोर्टरुममध्येच लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क अधिकार आहे' अशी सिंहगर्जना केली होती. या वास्तू आपल्या चौतन्यांमध्ये स्फुरण चढवतात. न्यायमूर्ती किती काम करतात हे आपल्याला माहिती आहे, मात्र दुसरीकडे न्यायविलंब होतो हे ही आपण पाहतो. न्यायाच्या प्रक्रियेमध्ये गती देण्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्य केले पाहिजे.

तसेच, उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उभारणी आम्ही लवकरच करु. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीपैकी आपली एक लोकशाही आहे. कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, प्रसारमाध्यमे ही आपली शक्ती आहेत. घटनेचे चारही स्तंभ आपल्या देशाचे मुख्य घटक आहेत. मात्र या चार स्तंभापैकी एक जरी स्तंभ कोसळला तर लोकशाहीचे छप्पर कोसळून पडेल, आणि हे झाले तर यासारखे आभागी आपणच. त्याचबरोबर आपण पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करत आहोत. पोलिस निवृत्त होईपर्यंत तो पोलिस नाईक झाला पाहिजे यासंबंधी मी घोषणा करतो आहे. शिवाय, वाईल्ड लाईफ लॅबची निर्मीतीही आम्ही नागपूरमध्ये करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शिवाय, महिलांवरील अत्याचार आपल्या देशात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. ज्या महिलांना घरच नाही त्यांच्यासाठी आम्ही निवाऱ्याची प्राथमिक स्तरावर सोय मुंबईमध्ये केली आहे. गुन्हेगारीमुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये आपण कुठे आहोत याचाही विचार यावेळी आपण केला पाहिजे, असही मुख्यंमत्री यावेळी म्हणाले. आपणही आपल्या स्वातंत्र्यांचे आमृतमंथन करायला हवे. आपल्या देशाच्या घटनेमध्ये नमेकं काय लिहलं आहे? राज्याचा आणि केंद्राचे संबंध कशाप्रकारे आहेत, याचा विचार केला पाहिजे. केंद्राएवढेच राज्यांना काही अधिकार आहेत, मात्र यातील काही अधिकार सोडले तर. कोणला किती अधिकार आहेत हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT