राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

मराठवाड्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

महसूल विभागाने (Department of Revenue) झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे वाहून गेला आहे. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून, अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेकांचे स्थलांतर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी या परिस्थितीची चर्चा केली असून, नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करावे सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा असे सांगितले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याचे पालकमंत्री, मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. मागील 24 तासांत राज्यात 26 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मराठवाड्यातील अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

या भागातील अनेक विद्यार्थी सीईटीच्या प्रवेशासाठी केंद्रावर पोहोचू शकले नसले तरी त्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना नवीन तारखांबाबत माहिती द्या असे निर्देशही देण्यात आले आहेत. एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने लातूर, उस्मानाबाद, औरंगाबात, यवतमाळ या भागातील 100 पेक्षा जास्त जवानांचे प्राण वाचविण्यात आले आहे. उस्मानाबादेतून 16, लातूरमधून 3 तर यवतमाळ आणि औरंगाबादेतून अनुक्रमे 2 जणांचे प्राण हेलिकॉप्टरने तसेच याच भागांतून बोटीने एकूण 91 जणांचे प्राण वाचविले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Escort Service Fraud: "गोव्यात दलालांची दादागिरी चालणार नाही!" मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा; 512 संशयास्पद वेबसाईट केल्या ब्लॉक

Galjibag Marine Sanctuary Goa: कासवांना मिळणार हक्काचं घर! गालजीबाग येथे सागरी अभयारण्य जाहीर, वनमंत्री राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

Goa Gas Cylinder Shortage: कुणी गॅस देता का गॅस? राज्यात सिलिंडरचा तुटवडा, कळंगुटसह अनेक भागांत ग्राहकांच्या रांगा; हॉटेल व्‍यवसाय संकटात

Sanjeevani Sugar Factory: ‘संजीवनी’साठी घोषणा झाली, अंमलबजावणी होणार का?

Rashi Bhavishya: काही राशींना मोठ्या संधी, तर काहींनी घ्यावी सावधगिरी; राशिभविष्य काय देतंय संकेत? वाचा..

SCROLL FOR NEXT