राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

मराठवाड्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

महसूल विभागाने (Department of Revenue) झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे वाहून गेला आहे. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून, अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेकांचे स्थलांतर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी या परिस्थितीची चर्चा केली असून, नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करावे सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा असे सांगितले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याचे पालकमंत्री, मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. मागील 24 तासांत राज्यात 26 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मराठवाड्यातील अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

या भागातील अनेक विद्यार्थी सीईटीच्या प्रवेशासाठी केंद्रावर पोहोचू शकले नसले तरी त्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना नवीन तारखांबाबत माहिती द्या असे निर्देशही देण्यात आले आहेत. एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने लातूर, उस्मानाबाद, औरंगाबात, यवतमाळ या भागातील 100 पेक्षा जास्त जवानांचे प्राण वाचविण्यात आले आहे. उस्मानाबादेतून 16, लातूरमधून 3 तर यवतमाळ आणि औरंगाबादेतून अनुक्रमे 2 जणांचे प्राण हेलिकॉप्टरने तसेच याच भागांतून बोटीने एकूण 91 जणांचे प्राण वाचविले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT