Children cross koyna dam by boat Dainik Gomantak
महाराष्ट्र

बोटीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचे धाडस बघून मुंबई हायकोर्ट निशब्द

विद्यार्थिनी स्वतः छोट्या होडीतून शाळेत जावे लागते, कोयना धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बोटीतून या विद्यार्थिनी प्रवास करतात

दैनिक गोमन्तक

इंडिया टुडे समूहच्या 'मुंबई तक'ने केलेला अहवाल बघून मुंबई उच्च न्यायालयाने एका घटनेची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही. अशी व्यथा मुंबई उच्च न्यायालयाने हा अहवाल बघून व्यक्त केली. (Bombay high court Notice cognizance courage of children who cross koyna dam by boat for education)

मुंबई तकने महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातील एका घटनेचा अहवाल केला होता. या जिल्ह्यातील मुलांना शाळेत जाण्यासाठी बोटीने नदी ओलांडून जावे लागते. या अहवालाची दखल घेत, न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एएस किलोर यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) रजिस्ट्रीला रोस्टर असाइनमेंटनुसार पुढील निर्देशांसाठी हे प्रकरण योग्य खंडपीठासमोर ठेवण्यास सांगितले आहे.

मुंबई तक इम्तियाज मुझावार यांनी साताऱ्यावर लक्षवेधी अहवाल दिला. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील खिरवंडी गावात विद्यार्थी स्वतः बोटीने शाळेत जातात असे सांगण्यात आले आहे. शाळकरी मुलांवर तयार केलेला हा अहवाल पाहिल्यानंतर उच्च न्यायालयानेही मुलांच्या धाडसाचे कौतुक केले. विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागत असल्याचे अहवालात दिसून आले. आणि या मुलांची शाळा सकाळी 9 वाजता सुरू होते.

विद्यार्थिनी स्वतः छोट्या होडीतून शाळेत (School) जात असल्याचे अहवालात दाखवण्यात आले. मुलीचे गाव संरक्षित क्षेत्रात येते. विद्यार्थिनींना प्रथम कोयना धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बोटीतून प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर दुसऱ्या टोकापासून घनदाट जंगलातून सुमारे 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या परिसरात अस्वल, वाघ आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.

यावर अहवालामध्ये दिसणारी परिस्थिती पाहता, या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती असलेले धैर्य, इच्छाशक्ती आणि जिद्दीचे न्यायालयाने कौतूक केले आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार काम करू शकते, असे न्यायालय म्हणाले. साताऱ्यातील मुलांच्या धाडसाचे कौतुक करताना न्यायालयाने सांगितले की, 'आम्ही सावित्री च्या मुली आहोत' या कवितेला मुकत आहोत. हे सांगताना न्यायालयाने कवितेतील चार ओळींचाही उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT