Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

गेम ओवर! विराट कोहली बाहेर, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय T20 संघ जाहीर

टी-20 विश्वचषकाचा संघ माजी भारतीय कर्णधार कोहलीशिवाय बनवला जाईल. निवड समितीने विराटला विंडीज दौऱ्यावर डावलून ही रणनीती राबविण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

Team India for West Indies T20 Tour: वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या पाच T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला या संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर*, भुवनेश्वर आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची अंतिम निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

विराट कोहलीला T20 संघात संधी मिळाली नाही

कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी विश्रांतीची मागणी केली होती. या मालिकेत त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. कॅरेबियन संघासोबतच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार रोहित संघात परतला असला तरी कोहली संघाबाहेर राहिला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची ही मालिका 29 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या संदर्भात विराटची या महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर पडणे त्याच्यासाठी चांगले लक्षण नाही.

T20 विश्वचषकात विराटच्या स्थानावर प्रश्नचिन्ह

आतापर्यंत बाहेरचे लोक कोहलीवर टीका करत होते. माजी कर्णधार कपिल देवपासून ते अजय जडेजापर्यंत अनेक दिग्गज टी-20 संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याचा खराब फॉर्म लक्षात घेऊन बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी पहिल्यांदाच मोठी कारवाई केली आहे. T20 विश्वचषकाच्या जवळपास तीन महिने आधी खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून त्याला वगळून निवडकर्त्यांनी मोठा संदेश दिला आहे. कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा संघ माजी भारतीय कर्णधार कोहलीशिवाय बनवला जाईल. निवड समितीने विराटला विंडीज दौऱ्यावर डावलून ही रणनीती राबविण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT