Sourav Ganguly gave big information on Team India's tour of South Africa Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार? सौरव गांगुलीचे मोठे विधान

दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फॉर्मवर प्रतिक्रिया दिली. दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. टीम इंडियाच्या दौऱ्यावर गांगुली म्हणाले की, सध्या ते पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पुढे जाईल. होईल. कोविड-19 च्या नवीन प्रकाराच्या आगमनाशी संबंधित परिस्थितीवर बोर्ड बारीक लक्ष ठेवून आहे. हार्दिक पांड्याचा बचाव करताना ते म्हणाले की ते लवकरच परत येतील.

कोविड-19 च्या (Covid-19) नवीन प्रकाराच्या प्रसाराबद्दल चिंता वाढत आहे. त्याचे नाव ओमिक्रॉन (Omicron) आहे. त्याची पहिली केस दक्षिण आफ्रिकेत नोंदवली गेली. जगभरातील अनेक देशांनी यापूर्वीच कठोर पावले उचलून दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी घातली आहे पण भारताने तसे केलेले नाही. मात्र, भारत सरकारच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार दक्षिण आफ्रिकेचा समावेश 'जोखीम असलेल्या' देशांच्या यादीत करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या दौऱ्यासाठी पूर्णपणे सुरक्षित बायो बबल तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या भारत अ संघही दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गांगुली काय म्हणाले

एका कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर गांगुली म्हणाले, 'आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार हा दौरा होईल. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून वेळ आहे. पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून होणार आहे. आम्ही याचा विचार करू. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा ही बीसीसीआयची नेहमीच पहिली प्राथमिकता राहिली आहे. येत्या काही दिवसांत काय होते ते पाहणार आहोत. भारत 3 डिसेंबरपासून मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध दुसरी आणि अंतिम कसोटी खेळणार आहे. यानंतर, संघ 8 किंवा 9 डिसेंबरला तेथून चार्टर्ड विमानाने जोहान्सबर्गला रवाना होणार आहे.

गांगुली यांनी हार्दिक पांड्याचा केला बचाव

भारताचा माजी कर्णधार गांगुली यांनी आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळाल्यानंतर संघात आपले स्थान पुन्हा मिळेल, असे सांगितले आहे. ते म्हणाले, 'तो चांगला क्रिकेटर आहे. तो तंदुरुस्त नाही, त्यामुळे तो संघात नाही. तो तरुण आहे, दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुनरागमन करेल अशी मला आशा आहे.

अलीकडेच महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हटल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, हार्दिक जेव्हा गोलंदाजी करत नव्हता, तेव्हा तो अष्टपैलू कसा झाला. याबद्दल सौरव गांगुली म्हणाले, त्याची तुलना कपिल देवसोबत करू नका. दोघेही वेगवेगळे खेळाडू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT