Smriti Mandhana Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

स्मृती मंधाना विराट-रोहितसोबत खास क्लबमध्ये दाखल, हरमनप्रीतने मोडला मितालीचा मोठा विक्रम

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. मंधानाने आज शनिवारी डंबुलामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 39 धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान तिने 34 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये तिने 8 चौकार मारले. तर दुसरीकडे हरमनप्रीतने भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला आहे.(Smriti Mandhana Harmanpreet Kaur)

मंधानाने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पेशल क्लबमध्येही सामील झाली आहे.T20I मध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.

विराट आणि रोहितसोबत स्पेशल क्लबमध्ये सामील

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मंधाना ही पाचवी भारतीय फलंदाज ठरली आहे. मंधानापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. मंधानाही आता या यादीत सामील झाली आहे.

हरमनप्रीत कौरने मिताली राजचा मोठा विक्रम मोडला

या मालिकेत हरमनप्रीतने इतिहास रचला आहे. तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिताली राजचा विक्रम मोडला आहे. हरमनप्रीत आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. मितालीने 2019 मध्ये या शॉर्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. हरमप्रीतच्या आता 123 सामन्यात 2372 धावा आहेत तर मितालीच्या 2364 धावा आहेत.

T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू

2372 - हरमनप्रीत कौर

2364 - मिताली राज

2011 - स्मृती मानधना

1094 - जेमिमा रॉड्रिग्ज

भारताने T20I मालिका जिंकली

भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी डंबुला येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 थ्रिलर सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला.या विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे.भारताने या मालिकेतील पहिला सामना 34 धावांनी जिंकला होता तर तिसरा आणि अंतिम सामना 27 जून रोजी याच स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 7 बाद 125 धावांवर रोखले आणि त्यानंतर 19.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT