Rohit Sharma & Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला का वगळलं? रोहितने सांगितले कारण

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवून 2-1 ने जिंकली मालिका

गोमन्तक डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाविरूद्धची (Australia Cricket Team) तीन सामन्यांची टी-ट्वेंटी (T-20) मालिका भारताने (Indian Cricket Team) 2-1अशा फरकाने खिशात घातली आहे. तथापि, तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याला वगळण्यात आले होते. त्याचे कारण आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्ट केले आहे.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी सीरीजमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यास सुरुवात होण्यापुर्वी भारतीय संघात केवळ एक बदल करण्यात आला. विकेटकीपर बॅटर ऋषभ पंतला वगळून त्या जागी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघात अंतिम 11 मध्ये संधी मिळाली.

त्याविषय़ी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, आधीचा पावसामुळे हा सामना प्रत्येकी 8 षटकांचा झाला. त्यामुळे भुवनेश्वरला संघाबाहेर बसावे लागले होते, आणि पंतचा अंतिम 11 खेळाडूंत समावेश केला होता. हैदराबाद येथे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामना जिंकणे हेच आमचे लक्ष्य होते. या फॉरमॅटमध्ये विजयाचा मोमेंटम राखणे महत्वाचे होते. नागपुरातील विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला. ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. विजयासाठी आम्हाला आमच्या बेसिक्वसवर लक्ष देणे गरजेचे होते. केवळ एक बदल केला, भुवी संघात परतला आहे आणि ऋषभ पंत या सामन्यात खेळणार नाही. गत सामन्यात आम्हाला केवळ चार गोलंदाज खेळवायचे होते. त्यामुळे दुर्दैवाने भुवनेश्वरला बाहेर बसावे लागले होते.

दरम्यान, भुवनेश्वर हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यानंतर टीकेचे लक्ष्य ठरला होता. त्याने एकही विकेट घेतली नव्हती आणि 49 धावा दिल्या होत्या. तथापि, तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धशतक झळकावलेला सलामीवीर कॅमेरून ग्रीन याची विकेट घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर तसेच हार्दिक पंड्यान केलेल्या नाबाद 25 धावांच्या फटकेबाजीमुळे हे लक्ष्य एक चेंडू राखून पार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT