T20 World Cup 2022 Final Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022 Final: शोएब अख्तरने केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला....

T20 World Cup 2022 Final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सामना खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताने चार विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यंदाच्या टी-20 विश्वचषकात अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघाची भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत भारताने एक सामना जिंकला आहे. तर, पाकिस्तानच्या संघाने एक सामना गमावला आहे. परंतु, हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील, जो टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना असेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारताला नक्कीच हरवेल, असेही त्यानी म्हटले आहे.

शोएब अख्तरने सांगितले, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. सुपर-12 फेरीच्या दोन्ही गटात प्रत्येकी सहा-सहा संघाचा समावेश करण्यात आला आहे. या दोन गटातून प्रत्येकी दोन-दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही गट-2 मधून उपांत्य फेरीत पोहोचल्यास त्यांची स्पर्धा गट-अ मधील दोन अव्वल संघांशी होईल, याचा अर्थ उपांत्य फेरी भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकत नाही.

  • 2007 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार का?

आयसीसीच्या (ICC) पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडले होते. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवून टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यावेळीही भारत पाकिस्तान एकाच गटात होते. यामुळे यंदाच्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT