Rohit Sharma|IPL Danik Gomantak
क्रीडा

IPL 2022 : गुजरातनंतर आणखी 3 संघ मुंबईच्या निशाण्यावर

अशा स्थितीत मुंबई या संघांसाठी धोकादायक ठरू शकते

दैनिक गोमन्तक

मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने पाच वेळा आयपीएल जिंकले आहे. पण IPL-2022 या संघासाठी सर्वात वाईट ठरला. सलग आठ पराभवांसह मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. या संघाने नवव्या सामन्यात या मोसमात पहिला विजय मिळवला. या संघाने आपल्या 10व्या सामन्यातही विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने गुजरात टायटन्सचा पराभव केला. मुंबई आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरी आता हा संघ प्लेऑफमध्ये जाणाऱ्या इतर संघांचे गणित बिघडवू शकतो. (ipl 2022 mumbai indians can create problem for delhi capitals sunrisers hyderabad kolkata knight riders)

मुंबईने आतापर्यंत 10 सामने खेळले असून आठ विजय आणि दोन पराभवांसह हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. या संघाला आता आणखी चार सामने खेळायचे आहेत आणि ज्या संघांविरुद्ध ते खेळणार आहेत त्यापैकी तीन संघ अजूनही प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दावेदार आहेत. अशा स्थितीत मुंबई या संघांसाठी धोकादायक ठरू शकते.

मुंबईला पुढील चार सामने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचे आहेत. चेन्नईचा संघही मुंबईप्रमाणे प्लेऑफमधून बाहेर पडला असला तरी कोलकाता, दिल्ली, हैदराबाद अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. गुणतालिकेत या संघांचे स्थान पाहिल्यास, दिल्ली सध्या 10 सामन्यांत पाच विजय आणि पाच पराभवांसह 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, हैदराबादचे आकडेही दिल्लीसारखे आहेत आणि नेट रन रेटच्या बाबतीत ते मागे आहे आणि त्यामुळे सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता 10 सामन्यांत चार विजय आणि सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबईने या संघांना पराभूत केल्यास या संघांचा प्लेऑफचा मार्ग कठीण होईल. उदाहरणार्थ, दिल्लीला अजून चार सामने खेळायचे आहेत आणि किमान तीन विजय आवश्यक आहेत. अशा स्थितीत जर ती मुंबईकडून हरली तर कठीण जाईल, अशीच स्थिती हैदराबादची आहे. कोलकाताला त्यांचे सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे आणि मुंबईविरुद्धच्या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगू शकते.

मुंबईला चांगला शेवट हवा आहे

त्याचवेळी मुंबई विजयाच्या मार्गावर परतली आहे. या संघाने गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा जास्तीत जास्त सामने जिंकून या मोसमाचा चांगला शेवट करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून खेळाडूंना आत्मविश्वास मिळेल आणि ते पुढील हंगामासाठी सज्ज होऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT