आयपीएल २०२०:‘सुरक्षा कवच’ नियम कठीण, पण अनिवार्य
आयपीएल २०२०:‘सुरक्षा कवच’ नियम कठीण, पण अनिवार्य 
क्रीडा

आयपीएल २०२०:‘सुरक्षा कवच’ नियम कठीण, पण अनिवार्य - श्रेयस अय्यर

वृत्तसेवा

शारजा: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘बायो बबल’ अर्थात सुरक्षा कवच त्याचे नियम पाळणे फारच आव्हानात्मक आहे; परंतु ते आवश्‍यकच आहे, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आणि मुंबईकर असलेल्या श्रेयस अय्यरने व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीचे सावट कायम असले तरी कठीण परिस्थितीत अनेक नियमांच्या चौकटी तयार करून आयपीएलचा घाट घालण्यात आला आहे. ५४ दिवस आणि तीन शहरात रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी जैव सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आयपीएलशी संबंधित प्रत्येकावर बंधने असणार आहेत.

अशा परिस्थितीत आपल्याला आयपीएल खेळावी लागेल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता. माणूस म्हणून पदोपदी नियम पाळणे सोपे नाही. पण आयपीएल यशस्वी करायची असेल तर आम्हा सर्वांना या सुरक्षा कवचाचे पालन करणे अत्यावश्‍यक आहे, असे अय्यरने सांगितले. 

काय आहेत ‘सुरक्षा कवचा’चे प्रमुख नियम

  •  प्रत्येक खेळाडूची दर पाच दिवसांनी कोरोना चाचणी
  •  जर एखादा खेळाडू पॉझिटिव्ह असला तर त्याला १४ दिवसांचे विलगीकरण. 
  •  या विलगीकरणानंतर २४ तासांत आरटी पीसीआर या दोन चाचण्या अनिवार्य.
  •  सुरक्षा कवचामध्ये समावेश असलेल्यांव्यतिरिक्त कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT