Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: टीम इंडियात बदलाचे वारे! निवड समितीच्या 'या' 5 निर्णयांनी दिला धक्का

Pranali Kodre

Team India: भारतीय क्रिकेट संघाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे. टी20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अनेक आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

1. विराट कोहली आणि रोहित शर्माला टी20 मालिकेसाठी विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशी चर्चा आहे की विराट कोहलीकडून टी20 क्रिकेटमधून विश्रांतीची मागणी करण्यात आली होती. तसेच रोहितला बांगलादेश दौऱ्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याचमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांती दिली आहे.

दरम्यान विराट आणि रोहित यांना आगामी 2024 टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात संधी मिळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. कदाचीत त्याचमुळे त्यांना यापुढे टी20 मध्ये कमी संधी दिली जाऊ शकते.

2. सूर्यकुमारकडे उपकर्णधारपद

टी20 मालिकेसाठी विराट, रोहितसह केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलने लग्नासाठी सुटी घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, रोहित आणि राहुल दोघेही टी20 संघात नसल्याने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

हार्दिकला टी20 संघाचा नियमित कर्णधार केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा आहे की रोहितला टी20 कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे श्रीलंका विरुद्धची मालिका या बदलाची सुरुवात ठरू शकते.

तसेच राहुल आणि श्रेयस हे दोघेही संघात नसल्याने सूर्यकुमारकडे टी20 संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

3. शिखर धवनला वगळले

गेल्या अनेक दिवसांपासून शिखर धवनला केवळ वनडे क्रिकेटमध्ये खेळवले जात होते. तसेच असेही अपेक्षित होते की धवन 2023 वनडे वर्ल्डकपपर्यंत भारताच्या वनडे संघात नियमित खेळवले जाईल. मात्र, त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघातून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. त्यामुळे असेही म्हटले जात आहे की धवनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात आली आहे.

त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारला देखील भारतीय संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

4. ऋषभ पंतचाही संघात समावेश नाही

ऋषभ पंत यालाही वनडे आणि टी20 संघात संधी देण्यात आलेली नाही. त्याचा मर्यादीत षटकांमधील फॉर्म सध्या चिंताजनक आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्याच्या वनडे आणि टी20 क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे त्याला वगळले असण्याची शक्यता आहे.

5. केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवले

केएल राहुलकडे गेल्या वर्षी भारतीय संघाच्या उपकर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आता त्याच्याकडून हे उपकर्णधारपद काढून घेण्यात आलेले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात त्याला संधी मिळाली आहे. मात्र, उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे.

  • श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

  • श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT