Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

AUS हरवा, नाहीतर वर्ल्ड कप विसरा...'; या दिग्गज क्रिकेटपटूने हिट मॅन ला दिले आव्हान

दैनिक गोमन्तक

Gautam Gambhir on Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ही मालिका जिंकून आगामी T20 विश्वचषकाची तयारी मजबूत करु इच्छितो. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहितला थेट आव्हान दिले आहे.

'ऑस्ट्रेलियाला हरवणे आवश्यक'

आपल्या सडेतोडपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आव्हान दिलं आहे. आगामी टी-20 मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवू शकली नाही, तर वर्ल्ड कप जिंकणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे त्याने म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, 'मी हे आधीही बोललो आहे, आणि आता पुन्हा सांगत आहे. आगामी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला (Australia) हरवले नाही, तर टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) जिंकता येणार नाही.'

ऑस्ट्रेलियाला हरवून आत्मविश्वास उंचावला

ऑस्ट्रेलियाला हरवल्याने संघाचा आत्मविश्वास वाढेल. गंभीर पुढे म्हणाला, '2007 च्या टी-20 विश्वचषकावर नजर टाकल्यास, आम्ही त्यांना (Australia) उपांत्य फेरीत पराभूत केले होते. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलिया हा सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी संघांपैकी एक आहे, जर तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला त्यांना पराभूत करावे लागेल.'

15 वर्षांपासून T20 विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहतोय

टीम इंडिया (Team India) गेल्या 15 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड ट्रॉफीची वाट पाहत आहेत. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही हा करंडक जिंकता आलेला नाही. विशेष बाब म्हणजे, गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वविजेत्या संघाचा भाग होता. या सामन्यात सलामीवीर म्हणून त्याने 75 धावांची शानदार खेळीही खेळली होती. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT