Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ZIM: 'आंघोळीला कमी पाणी वापरा' BCCIचा Team Indiaला नवीन नियम

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावरती आहे. येथे 18 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये वनडे सीरीज खेळवली जाणार आहे.

Pragati Sidwadkar

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावरती आहे. येथे 18 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. तसेच ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने खेळाडूंच्या आंघोळीबाबत काही सूचना दिल्या आहेत आणि त्याच वेळी, त्याचे पूल सेशन देखील कापले गेले आहे. यातून बीसीसीआयने खेळाडूंना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. (IND vs ZIM Use less water in the bath BCCI new rule for Team India)

खरे तर, झिम्बाब्वेमधील हरारे जलसंकटाचा सामना करत आहे. येथे पाण्याची खूप टंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. अंघोळ करताना पाणी कमी वापरण्यास संघाला यावेळी सांगण्यात आले आहे.

वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. यासाठी खेळाडूंना पाण्याची बचत करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच संघाचे पूल सेशन देखील कापण्यात आले आहे.

याआधीही भारतीय संघाला परदेश दौऱ्यावर पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते, हे मात्र लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडिया 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही गेली होती आणि त्यावेळी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे पिण्याच्या पाण्याचीही समस्या देखील होती. 2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना केपटाऊनला पाण्याचे संकट आले होते आणि तेथेही संघाला कमी पाणी वापरण्यास सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT