जडेजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44 षटके टाकली, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघ तिसऱ्या कसोटीत अश्विनला संधी देऊ शकतो.
जडेजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44 षटके टाकली, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघ तिसऱ्या कसोटीत अश्विनला संधी देऊ शकतो. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी अश्विनला संधी मिळण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटीसाठी रविचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (India's playing XI) समावेश न केल्याने सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जेव्हा रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य देण्यात आले, तेव्हा कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. जडेजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44 षटके टाकली, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघ तिसऱ्या कसोटीत अश्विनला संधी देऊ शकतो.

जडेजा हा पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज होता मुख्यतः त्याने फलंदाजीतही योगदान दिले आहे. नॉटिंगहॅम आणि लंडनमधील हवामान हे त्याला खेळविण्यात महत्त्वाचे होते. ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स या दोन्ही ठिकाणी अधूनमधून पाऊस आणि ढगाळ आकाश, भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल होते. त्यामुळे फलंदाजीचा क्रम मजबूत करण्यासाठी जडेजाची संघात निवड केली गेली.

पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने 16 षटके टाकली त्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. यादरम्यान इंग्लंडचे फलंदाज त्याची गोलंदाजी सहज खेळताना दिसले नाहीत. दुसऱ्या कसोटीतही जडेजा फारसा प्रभाव सोडू शकला नाही. जडेजाने 28 षटके टाकली आणि 48 धावा दिल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याला सहज खेळवले. दुसरीकडे, इंग्लंडचा एकमेव फिरकीपटू मोईन अलीने दुसऱ्या कसोटीत तीन विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यात जडेजाला आत्तापर्यंत फक्त दोन विकेट मिळाल्या आहेत. त्याने WTC फाइनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याला एक विकेट घेता आली. दुसरीकडे अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चार विकेट्स घेतल्या, तर सराव सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या.

मुश्ताक मोहम्मदने द टेलीग्राफ इंडियाला सांगितले, “अश्विन भारताच्या गेम प्लॅनचा महत्त्वाचा भाग असू शकतो. तो इशांतपेक्षाही चांगली फलंदाजी करू शकतो. तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टीही अश्विनच्या बाजूने असेल. कारण लीड्समधील तिसऱ्या कसोटी दरम्यान कोरड्या परिस्थितीचा अंदाज आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे आणि सूर्यप्रकाशाची शक्यता देखील आहे. याचा अर्थ परिस्थिती कोरडी असेल तर विराट गोलंदाजीमध्ये बदल करु शकतो. चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूऐवजी तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारत तिसऱ्या कसोटीत उतरु शकतो.

जर सामन्याच्या आधी पावसाने व्यत्यय आणला तर जडेजाच्या जागी अश्विनचा समावेश होऊ शकतो, पण जर हवामान कोरडे राहिले तर जडेजा आणि अश्विन दोघांनाही संघात स्थान दिले जाऊ शकते. अशावेळी इशांतला बाहेर बसावे लागू शकते. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी परिस्थिती लक्षात घेऊन प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT