West Indies vs Australia X/cricketcomau
क्रीडा

'थांबा, अपीलच केलं नाही...' रनआऊट असूनही नाबाद दिल्याने AUS vs WI सामन्यात राडा, वाचा काय सांगतात नियम

Pranali Kodre

Australia denied a run out as Umpire says they did not appeal:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात रविवारी (11 फेब्रुवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी विजय मिळवला. मात्र हा सामना एका घटनेमुळे बराच चर्चेत राहिला.

झाले असे की ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिजला अखेरच्या दोन षटकात 53 धावांची गरज होती.

यावेळी स्पेन्सर जॉन्सनने गोलंदाजी केलेल्या 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अल्झारी जोसेफने कव्हरला फटका मारला आणि जेसन होल्डरसह चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मिचेल मार्शने चेंडू आडवला आणि गोलंदाजाच्या एन्डकडे फेकला.

त्यावेळी स्पेन्सरने चेंडू पकडून स्टंप उडवले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विकेटसाठी फारसा उत्साह दिसला नाही आणि स्पेन्सरही नंतर पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करायला गेला.

दरम्यान, त्याचवेळी मैदानावरील पंच गेराल्ड अबूद त्यांच्या रेडीओवर 'नो अपील' असे म्हणताना दिसले. त्यानंतर त्या चेंडूचा रिप्ले मोठ्या स्क्रिनवर मैदानात दाखवण्यात आला, त्यात जेव्हा स्पेन्सरने बेल्स उडवले, त्यावेळी जोसेफ क्रिजमध्ये पोहचला नसल्याचे दिसले. ते पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू विकेटचे सेलिब्रेशन करू लागले.

मात्र त्याचवेळी पंचांनी अल्झारी जोसेफला नाबाद घोषित केले, कारण ऑस्ट्रेलियाने या विकेटसाठी अपील केले नव्हते. यानंतर बराचवेळ चर्चा झाली. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सांगितले की त्यांनी अपील केले होते.

पण पंच अबूद यांनी सर्वांना चर्चा थांबवून पुन्हा खेळ सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे जॉन्सन पुढचा चेंडू टाकण्यासाठी गेला. दरम्यान, जोसफेला मिळालेले हे जीवदान ऑस्ट्रेलियाला फार महागात पडले नाही, कारण वेस्ट इंडिज संघ 20 षटकात 9 बाद 207 धावाच करू शकले.

दरम्यान, या घटनेमुळे नक्की अपीलचा नियम आहे काय, याबद्दल चर्चेला उधाण आले. दरम्यान क्रिकेटचे नियम निश्चित करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या नियमावलीत याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. नियम क्रमांक 31 अपीलबाबत आहे.

Cricket Appeal Rule

यातील 31.1 नियमात सांगण्यात आले आहे की फलंदाज जरी बाद असला, तरी जोपर्यंत क्षेत्ररक्षकांकडून विकेटसाठी अपील केले जात नाही, तोपर्यंत पंच त्या फलंदाजाला बाद देऊ शकत नाही. पण यामुळे जर फलंदाज नियमानुसार बाद असेल आणि मैदान सोडून जात असेल, तर त्याला आडवता येत नाही.'

त्याचबरोबर 31.3 नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेटसाठी पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी किंवा पंचांकडून तो चेंडू पूर्ण झाल्यानंतर वेळ संपल्याचे घोषित होण्यापूर्वी अपील करण्याची परवानगी असते. तसेच 31.4 नियमानुसार “How’s That?” असे विचारत केलेल्या अपीलमध्ये सर्व गोष्टी सामाविष्ठ असतात.

Cricket Appeal Rule

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी 31.7 नियमानुसार की जर फलंदाजाला बाद दिलेले नसतानाही, जर त्याने बाद असल्याच्या गैरसमजातून मैदान सोडले असेल, तर पंच पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी त्या फलंदाजाला परत बोलवू शकतात. जर ही विकेट अखेरची असेल, तर पंच मैदान सोडण्यापूर्वी त्या फलंदाजाला पुन्हा मैदानात बोलवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT