bad food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

खराब अन्न खाल्याने दरवर्षी किती लोक मरतात? ज्यामुळे होतात घातक अजार, जाणून घ्या WHO ची आकडेवारी

World Health Organization: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी 4 लाख 20 हजार लोक खराब अन्नामुळे आपला जीव गमावतात. यापैकी 70 टक्के लोक पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

Manish Jadhav

महाराष्ट्रातील पुण्यात मागील काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीरमध्ये एका गूढ आजाराची प्रकरणे समोर येत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या संसर्गाचे कारण खराब झालेले अन्न आणि पाणी असल्याचे मानले जात आहे. जरी हा केवळ एक संशय उपस्थित केला जात असला तरी आरोग्य विभागाने त्याला दुजोरा दिलेला नाही. तरी खराब अन्न आणि पाण्यामुळे कोणते आजार होतात आणि जगभरात दरवर्षी किती लोक यामुळे मरतात हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

दरवर्षी किती लोक मरतात?

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी 4 लाख 20 हजार लोक खराब अन्नामुळे आपला जीव गमावतात. यापैकी 70 टक्के लोक पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. खराब अन्नामुळे अनेक आजार होतात. अशा अन्नात धोकादायक बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे पोटाचे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात.

खराब अन्नामुळे कोणते आजार होतात?

खराब अन्नामुळे होणारा सर्वात मोठा धोका संसर्गाचा असतो. कारण धोकादायक बॅक्टेरिया आणि पॅरासाइट्स खराब झालेल्या अन्नामध्ये वाढतात. जर एखाद्या व्यक्तीने असे अन्न खाल्ले तर हे पॅरासाइट्स आणि धोकादायक बॅक्टेरिया पोटात जातात आणि आजार निर्माण करतात. यातील पहिले लक्षण म्हणजे अन्नातून विषबाधा होणे. त्यामुळे पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात. काही प्रकरणांमध्ये लक्षणे आणखी वाढतात. दीर्घकाळापर्यंत अतिसारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

स्टमक फ्लू

खराब अन्न खाल्ल्याने स्टमक फ्लूसारखे गंभीर आजार होऊ शकतात. या आजारामुळे आतडे सुजतात. याला 'व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस' असेही म्हणतात. हा आजार धोकादायक बॅक्टेरिया किंवा रोटाव्हायरसमुळे होतो. त्याची बहुतेक प्रकरणे लहान मुलांमध्ये दिसून येतात. यामध्ये अचानक जुलाब, उलट्या आणि पोटात तीव्र वेदना होतात. या आजारावर वेळेवर उपचार घेणे महत्वाचे असते, अन्यथा रुग्णाची (Patient) प्रकृती बिघडू शकते. नियमितपणे हात धुवून आणि शिळे अन्न न खाल्ल्याने हा आजार टाळता येतो.

खराब झालेले अन्न म्हणजे काय?

जे अन्न जास्त काळ साठवले जाते आणि त्याची चव किंवा वास बदलतो त्याला खराब झालेले अन्न म्हणतात. त्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया (Bacteria) वाढतात जे आरोग्य बिघडवतात. काही जीवाणू इतके धोकादायक असतात की ते मृत्यूला कारणीभूत ठरु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT