Turtle Ring Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Turtle Ring Benefits: कासवाची अंगठी घातल्याने काय फायदे होतात? इथे वाचा

आयुष्यात यश प्राप्ती करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

Kavya Powar

Turtle Ring Benefits: आयुष्यात यश प्राप्ती करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे कासवाची अंगठी. अनेकजण कासवाची अंगठी वापरतात. याचे कारण असे की कासवाची अंगठी केवळ आकर्षक दिसत नाही तर ती संपत्ती आणि समृद्धी देखील आकर्षित करते.

असे म्हटले जाते की कासवाच्या आकाराची अंगठी घातल्याने दुर्दैव दूर होते. जो कोणी कासवाची अंगठी धारण करतो त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते.

कासवाची अंगठी घालण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी धारण केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सभोवताली सकारात्मक ऊर्जा येते. ज्योतिषशास्त्रात कासवाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते धारण केल्याने घरामध्ये ऐश्वर्य आणि सुख-समृद्धी येते.

असे मानले जाते की जो कासवाची अंगठी घालतो त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आणि संपत्ती प्राप्त होते. यासोबतच आर्थिक संकटही दूर होते. कासवाला शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जाते.

कासवाची अंगठी घालताना पाळा 'हे' नियम

असे मानले जाते की कासवाची अंगठी फक्त चांदीच्या धातूपासून बनवावी तरच त्याचे शुभ परिणाम दिसून येतात. ही अंगठी फक्त उजव्या हातात घातली पाहिजे. डाव्या हातावर धारण केल्याने कोणताही फायदा होत नाही.

कासवाची अंगठी फक्त उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटात घातली पाहिजे. ते परिधान करताना, कासवाचे डोके तुमच्या दिशेने असावे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT