jaggery Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हिवाळ्यात गुळाचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते, जाणून घ्या कारण

आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी गुळाचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे

दैनिक गोमन्तक

गूळ खाल्ल्याने आरोग्यावर किती दुष्परिणाम होतात असे विचारले तर त्याचे सोपे उत्तर असे आहे की ते गुळाच्या गुणवत्तेवर आणि तुमच्या आरोग्याच्या समस्यांवर अवलंबून असते. गुळात अनेक पोषक घटक (Nutrients) असतात, त्यामुळे बहुतेक लोक साखरेऐवजी गूळ (jaggery) खाणे पसंत करतात. पण अनेक वेळा लोक गरजेपेक्षा जास्त गुळाचे सेवन करू लागतात आणि शारीरिक नुकसान सोसावे लागते. आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी गुळाचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. उदाहरणार्थ, मायग्रेन, अपचन, चक्कर येणे आणि अस्वस्थता यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त गूळ खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते.

जर तुम्ही दिवसभरात भरपूर गूळ खाल्ले तर त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. 10 ग्रॅम गुळात 9.7 ग्रॅम साखर असते.

जर तुम्ही जास्त गूळ खाल्ले तर ते तुमची रक्तातील साखर वाढवते, ज्यामुळे अनेक समस्या सुरू होतात.

जर शरीरात आधीच सूज असेल तर गुळाचे सेवन तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. गुळात सुक्रोज जास्त असते ज्यामुळे जळजळ वाढते. संशोधनात हे देखील सिद्ध झाले आहे की जेव्हा सुक्रोज, ओमेगा -3 फॅटी ऍसिड शरीरात एकत्र मिसळतात तेव्हा शरीरात जळजळ होण्याची समस्या सुरू होते.

गावोगावी गुळ बनवण्याची प्रक्रिया केली जाते. असा गूळ जमिनीच्या संपर्कात येत राहतो. त्यामुळे ते खाल्ल्याने पोटात जंत होण्याची शक्यता असते.

गुळ हा उष्णता वाढवणार पदार्थ आहे. अशा स्थितीत याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे नाकातून रक्त येऊ शकते.

जास्त गूळ खाल्ल्यानंतर अनेकदा अपचन आणि पोट बिघडते. नवीन गुळामुळे पचनास त्रास होतो. त्यामुळे गूळ खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करावा. गूळ खाल्ल्यानंतर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT