Mata Lakshmi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kartik Purnima 2023: कार्तिक पौर्णिमेला 'या' चुका करू नका, अन्यथा... माता लक्ष्मी होईल नाराज

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला खुप महत्व आहे.

Puja Bonkile

Kartik Purnima 2023: हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी आणि चंद्र यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. पचांगनुसार वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा तिथी असतात. यापैकी एक म्हणजे कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नियमांचे पालन केले पाहिजे, तरच पूजेचे फळ मिळते. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही काम केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असे शास्त्रात मानले जाते. यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते. त्याचबरोबर एखादे काम करणे टाळावे अन्यथा चंद्राचे प्रतिकूल परिणाम होतील.

  • कार्तिक पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये?

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र नदीत स्नान करावे. या दिवशी नदीत आंघोळ केल्याने नकारात्मकता तर दूर होतातच पण अनेक आजारांपासून दूर देखील राहतात.  

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच तिच्या स्तोत्राचेही पाठ केले पाहिजे. असे केल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आणि आशीर्वादही राहतो. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मासांहार करणे टाळावे. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नका. त्यामुळे उपासनेत दोष निर्माण होतो. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरात अंधार ठेवू नका. अंधार पडल्यावर माता लक्ष्मी परत येते. तसेच या दिवशी दूध किंवा चांदीचे दान करू नका. यामुळे चंद्र दोष निर्माण होतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

SCROLL FOR NEXT