Diabetes and eye health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes: मेधुमेही रुग्णांनो सावधान! डोळ्यांतील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो

Diabetes And Eye Health: मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांच्या संदर्भात काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही तुमची दृष्टी कायमची गमावू शकता. चला तर मग या लक्षणांबाबत जाणून घेऊया...

Manish Jadhav

देशात मागील काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. यासोबतच, त्याचा अनेक अवयवांवरही विपरीत परिणाम होतो. मधुमेहाचा मूत्रपिंड आणि हृदयावर परिणाम होतो. याशिवाय, डोळ्यांवरही परिणाम होतो. मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांच्या संदर्भात काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही तुमची दृष्टी कायमची गमावू शकता. चला तर मग या लक्षणांबाबत जाणून घेऊया...

दृष्टी कायमची गमावू शकता

मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे. सुरुवातीला मधुमेहाची लक्षणे बराच काळ जाणवत नाहीत. मधुमेहाचे निदान होईपर्यंत शरीराच्या अनेक भागांना आधीच हानी पोहोचते. म्हणून वयाच्या पंचवीशीनंतर मधुमेहासंबंधी चाचण्या सातत्याने कराव्यात. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढते तेव्हा त्याची लक्षणे डोळ्यांमध्येही दिसू लागतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अंधुक दृष्टी समाविष्ट आहे. ही लक्षणे दिसल्यानंतर वेळेवर उपचार घेतले नाहीतर तुम्ही कायमची दृष्टी गमावू शकता.

लक्षणे काय आहेत?

मधुमेहानंतर डोळ्यांचा सर्वात गंभीर आजार ग्लूकोमाचा धोका कायम राहतो. त्यामुळे या आजाराला प्रतिबंधित करणे आवश्यक ठरते. ग्लूकोमामुळे नुकसान झालेल्या डोळ्यांवर उपचार शक्य नाहीत. याशिवाय, मधुमेहामुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू देखील होऊ शकतो. मधुमेहामुळे डोळ्यांच्या लहान रक्तवाहिन्यांची मोठी हानी होते, ज्यामुळे सुरुवातीला दृष्टी अंधुक होते. याशिवाय, डोळ्यांमध्ये सूज आणि जळजळ देखील होऊ शकते.

स्वतःचे असे रक्षण करा

मधुमेहामुळे होणारे ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार टाळण्यासाठी डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसल्यास उशीर करु नका. ताबडतोब डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घेऊन उपचार सुरु करा. यासोबतच, तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी बदलून साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकता. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली नाहीतर डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT