Copper Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits Copper Water in Summer: उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे की नाही? आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे...

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्त या समस्या दूर होतात.

दैनिक गोमन्तक

Benefits Copper Water in Summer: आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विकारामुळे लोकांमध्ये पोटदुखीची समस्या वाढत आहे. हे टाळण्यासाठी लोक सर्व प्रकारचे उपाय करत असतात.

पोटाचे विकार दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अनेकजण योग्य मानतात. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्त या समस्या दूर होतात.

पण उन्हाळ्यातही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे का आणि असेल तर किती प्रमाणात प्यावे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल उपयुक्त माहिती देऊ.

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याला चार्ज केलेले पाणी म्हणतात. तांब्याच्या भांड्यात साधारण 7-8 दिवस पाणी ठेवल्याने हे गुण पाण्यात येतात. त्यामुळे ते पाणी आपोआप थोडे गरम होऊ लागते.

अशा परिस्थितीत जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायले तर पोटाची समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पोटातील आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होते. यासोबतच गॅस-अ‍ॅसिडिटीसह पोटाशी संबंधित इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.

तथापि, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की जर एखाद्याला ऍसिडिटी किंवा अल्सरची समस्या असेल तर त्याने उन्हाळ्यात हे पाणी पिणे टाळावे.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. याच्या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांधेदुखीच्या समस्येपासून बचाव करतात.

हे पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. इतकंच नाही तर तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात अँटी-कार्सिनोजेनिक घटक असतात, ज्यामुळे या घातक आजारापासून बचाव होतो.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

उन्हाळ्यात दिवसभर तांबेच्या भांड्यात साठवलेले पाणी पिऊ नका. ज्यांना अल्सरचा त्रास आहे त्यांनी हे पाणी पिऊ नये. जर तुम्हाला किडनी किंवा हृदयाचा त्रास होत असेल तर हे पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अॅसिडिटीचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ नये. असे केल्याने त्यांची समस्या वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT