Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

पेडणेत युवक ठार; मालिका थांबेना!

आजही राज्यात काही ठिकाणी अपघात झाले. धारगळ येथील अपघातात एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले

दैनिक गोमन्तक

मोरजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासूून सुरू असलेली भीषण अपघातांची मालिका थांबायचे नावच घेत नाही. आजही राज्यात काही ठिकाणी अपघात झाले. धारगळ येथील अपघातात एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले, तर फातोर्डा येथे बसमधील 5 मुले जखमी झाली.

(Youth killed in an accident in pernem)

कासिमभाट-वझरी येथील चेतन सुभाष परब (19) या युवकाला दाडाचीवाडी-धारगळ येथे ट्रकने चिरडले. यात त्याच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला. शिवाय त्याच्या शरीराचे अवयव विखुरले होते. त्यामुळे घटनास्थळी मन सुन्न करणारे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक रोखून धरला आणि थोड्या प्रमाणात त्याची मोडतोडही केली. मात्र, पोलिस वेळीच घटनास्थळी पोचल्याने वातावरण निवळले. ही घटना 30 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी, की चेतन परब हा धारगळ-सुकेकुळण मार्गे वझरी पेडणे याठिकाणी जात असता, समोरून येणाऱ्या अवजड ट्रकने (क्र. एमएच 46- बीयु 0697) त्याला धडक दिली. यावेळी त्याची दुचाकी ट्रकच्या चाकाखालीच राहिली आणि किमान दहा मीटर त्याला फरपटत नेले. त्यात चेतनचा जागीच मृत्यू झाला. शिवाय त्याच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT