Sasashti  Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : लोकांना समजण्यासाठी लेखकांनी अभिव्यक्ती सौम्य करू नये : माधव बोरकर

Sasashti News : ‘भास-संवाद’कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक मेल्विन रॉड्रिग्ज यांचाही सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News :

सासष्टी, प्रत्येक कविता किंवा साहित्यकृती स्वतःचे नशीब घेऊन येते. कवितेच्या प्रवासाबरोबर कवितेची भाषा वाढत जाते. लोकांना समजण्यासाठी लेखकाने आपली अभिव्यक्ती सौम्य करू नये. आज वाचकाला समजले नाही तर उद्या समजेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक माधव बोरकर यांनी व्यक्त केले.

कोंकणी भाषा मंडळाने जागतिक मातृभाषा दिनानिमित्त ‘भास-संवाद’कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नामवंत लेखक माधव बोरकार आणि मेल्विन रॉड्रिग्ज यांच्या कडे वार्तालाप घडवून आणला.

फादर आग्नेल महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवा लेखिका ममता वेर्लेकर आणि आकाश गांवकार यांनी मुलाखती घेतल्या.

प्रत्येक कवितेत लेखकाचा अनुभव गोठलेला असतो, जो कालांतराने समोर येतो. फॅशन म्हणून कविता लिहू नका. त्यात सामाजिक विषयांचा समावेश असला तरी कविता कलात्मक पातळीवर किती पुढे जाते हेही महत्त्वाचे आहे. तो कालबाह्य होता कामा नये, असे बोरकर म्हणाले.

फक्त फेसबुकवर लाईक्स मिळाल्याने कविता चांगली होत नाही. ते फक्त इतरांना चांगले दिसण्यासाठी असते. त्यापलीकडे कविता लिहिल्या पाहिजेत. जेव्हा मी कविता लिहितो तेव्हा कोणाला तरी ती आवडावी किंवा त्याची प्रशंसा करावी म्हणून लिहीत नाही. जेव्हा एखादी गोष्ट मला अस्वस्थ करते तेव्हा ती कवितेच्या रूपात समोर येते, असे ज्येष्ठ लेखक मेल्विन रॉड्रिग्ज म्हणाले. मी आजच्या समाजातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहितो.

कोकणी साहित्यावर समिक्षा झालीच पाहिजे, पण ती समिक्षा पचवण्याची क्षमता आपल्या लेखकांमध्ये आहे का, असा प्रश्न या दोन ज्येष्ठ साहित्यिकांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमाला गोव्यातील अनेक महाविद्यालये आणि गोवा विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

तर साहित्य उरणार नाही

भारताबाहेर आखाती प्रदेशात जाऊनही लेखक मेल्विन रॉड्रिग्ज यांनी कोकणी सोडली नाही. तेथे त्यांनी कोकणची सेवा सुरू ठेवली आणि नंतर चांगला पगार असूनही ते भारतात परत आले. कारण त्यांना कोकणासाठी काम करायचे होते.

कविता ट्रस्टची स्थापना आखाती देशात झाली आणि आज भारतात कवितांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यासोबतच पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. या गोष्टी परस्परावलंबी आहेत. आपले पर्यावरण आणि निसर्ग नाहीसा झाला तर साहित्य उरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT