Work on Navelim bridge is incomplete Dainik Gomantak
गोवा

तळावली-बाणावली पुलाचे काम अर्धवट...

साळ नदीच्या पात्रात या पुलाची कमान तेवढी उभी

दैनिक गोमन्तक

मडगाव: गेले दीड तप अधांतरी अवस्थेत असलेल्या तळावली-बाणावली पुलाचे भाग्य आता तरी उजळेल का, असा प्रश्‍न नावेली व बाणावलीवासीय आता करू लागले आहेत. साळ नदीच्या पात्रात या पुलाची कमान तेवढी उभी आहे. दोन्ही किनारे जोडले न गेल्याने या कमानीचा वापरही करता येत नाही, अशा अवस्थेत हा पूल लोंबकळत पडला आहे.2007 मध्ये नावेलीतून निवडून आल्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री बनलेल्या चर्चिल आलेमाव यांनी साळ नदीवर तीन पुलांची योजना आखली होती.

वार्का तसेच असोळणे-केळशी हे पूल पूर्णही केले; तर तळावली नावेली येथील पूल अर्धवट राहिला होता. नंतर ते पराभूत झाले. त्यांचा पराभव केलेल्या आवेर्तान फुर्तादो यांनी त्या पुलाला विरोध केल्याने झालेले बांधकाम तसेच अर्धवट राहिलेले आहे.

ताज्या निवडणुकीत पुलाचे विरोधक आवेर्तान तसेच समर्थक चर्चिल हे पराभूत झालेले असल्याने सरकार आता तरी अर्धवट स्थितीतील हा पूल पूर्ण करणार का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या पुलाचे काम पुन्हा हाती घेण्यास आपला अजूनही विरोध असेल; कारण त्याच्या जोडरस्त्यासाठी अनेक घरे व कंपाऊंड पाडावी लागतील, असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT